रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करून त्यातील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत सामावून घेण्याच्या शासकीय निर्णयानुसार गेल्या ६ वर्षांमध्ये जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील २२५ शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या कारवाईचा सर्वाधिक फटका संगमेश्वर आणि खेड तालुक्याला बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत २० पेक्षा कमी पटाच्या शाळांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून या शाळांमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयाची शासनाने अंमलबजावणी सुरू केली. १ ते १० आणि ११ ते २० पटसंख्या असलेल्या सर्व शाळांची संख्या आणि त्यात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुलांच्या अध्यापनाचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्तेची स्थिती फारशी समाधानकारक नसते. विद्यार्थ्यांची प्रगती होत नाही अशी कारणे पुढे आली होती. त्यामुळे २० च्या आतील पटसंख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत पाठवण्याच्या सूचना केल्या गेल्या. रत्नागिरी जिल्ह्यात २०१६-१७ या आर्थिक वर्षांपासून अंमलबजावणी सुरू झाली. पहिल्या वर्षी २२ शाळा बंद करण्यात आल्या. २०१६-१७ ला १०९ शाळा, २०१८-१९ मध्ये २ शाळा, २०१९-२० मध्ये २६ शाळा, २०२०-२१ मध्ये ३५ शाळा, २०२१-२२ मध्ये २२ शाळा बंद केल्या गेल्या आहेत.

More Stories onशाळाSchools
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 225 schools of ratnagiri zilla parishad closed in six years zws
First published on: 03-08-2022 at 05:25 IST