पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं बोललं जात आहे. पुण्याच्या कारभारात अजित पवारांकडून हस्तक्षेप होत असल्याने चंद्रकांत पाटलांनी ही तक्रार केल्याचं समजत आहे. पुणे शहराच्या कारभाराची सूत्रे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे असली, तरी अजित पवार यांनी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित करून बैठकांवर बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित बैठकांना पालकमंत्री म्हणून पाटील यांना निमंत्रित करण्यात येते. मात्र, बैठकीच्या केंद्रस्थानी पवार हेच असतात. तसेच बैठकांमध्ये निर्णय जाहीर करण्याचेही सोपस्कारही पवार हेच पार पाडतात. त्यामुळे पाटील हे नाममात्र पालकमंत्र्यांच्या भूमिकेत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व घडामोडींवर शिंदे गटाचे आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chief Minister Eknath Shindes rally to campaign for Mahayuti candidate Rajshree Patil Mahale
भर उन्हात मुख्यमंत्र्याचे जय श्रीराम, जय हनुमान…
Udayanraje Bhosle filled the nomination form in a show of strength
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

हेही वाचा- “मुख्यमंत्री झालो तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन”, शिंदे गटाच्या आमदाराचं विधान चर्चेत

“चंद्रकांत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ काय बोलले? हे मला माहीत नाही. ते वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यात काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. परंतु, असं समन्वय नसल्याचं वातावरण महाराष्ट्रात कुठेही नाही. सगळे नेते महाराष्ट्रात चांगल्याप्रकारे समाजकारण आणि राजकारण करणारे आहेत. त्यामुळे सगळ्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात काय चर्चा झाली, हे मला माहीत नाही,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “त्यांना कसं संपवायचं, हे…”, नितीन गडकरींविरुद्धच्या कथित कटाबद्दल संजय राऊतांचं विधान

उदय सामंत पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री आहे. प्रत्येकाकडे दोन-तीन जिल्हे आहेत. त्यामुळे प्रत्येकाकडे एक-एक जिल्हा द्यावा, अशी महायुतीतील चर्चा असू शकते. परंतु एखाद्या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाहीत, असं स्थिती कुठेही नाही. फक्त जेवढे जिल्हे आहेत, तेवढी मंत्र्यांची संख्या नसल्याने काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी झेंडावंदन केलं.”