आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जपली पाहिजे या उद्देशाने सगळ्या विद्यापीठातील आणि महाविद्यालयांमधील सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीतानेच करावी, असा निर्णय घेणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटगृहात चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत होत असते. आपला देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. याची आठवण विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. तसंच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे यासाठी विद्यापीठं, महाविद्यालये या ठिकाणी होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीतानेच झाली पाहिजे अशीही भूमिका त्यांनी मांडली. आपल्या मातृभाषेचा अभिमान आपल्याला असायला हवा. सगळ्या महाविद्यालयांच्या नावांचे फलक मराठीतच लावण्यात यावेत यासाठीच्या सूचनाही महाविद्यालयांना देणार असल्याचं सामंत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An order will soon be passed to mandate starting of public programs with singing of national anthem in colleges universities of the state says uday samant scj
First published on: 28-01-2020 at 22:25 IST