शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी (८ फेब्रुवारी) रात्री गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, रुग्णालयात उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मॉरिस नोरोन्हा या इसमाने घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर मॉरिसने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे दहिसर हादरलं आहे. त्याचबरोबर पोलिसांनी रुग्णालय परिसर सील केला आहे.

या हत्याकांडामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात कल्याणमध्ये भाजपा आमदाराने शिंदे गटातील नेत्यावर पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला होता. राज्यात अशा घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या घटनांमुळे विरोधक राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले आहेत. तसेच राज्य सरकारवर टीका करत आहेत. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “ही निवडणूक आहे, लढाई नाही, त्यामुळे राजकीय पक्षांनी…”; छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया!
Vasai, child abuse, stepmother, Stepmother Brutally Assaults Children, Waliv Police Station,
वसई : सावत्र आईकडून दोन चिमुकल्यांचा अमानुष छळ; गुप्तांगाला गरम चाकूने चटके, अमानुष मारहाण
Addiction, Abuse, Womens Commission, Akola,
“व्यसनाधीनतेतून शोषणासारख्या गैरकृत्यात वाढ,” महिला आयोगाच्या माजी सदस्यांचा निष्कर्ष
Man arrested, Man molesting girl,
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला अटक
pune, firing case
पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार, ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल
Haji Sarwar, murder, Chandrapur, Digras,
चंद्रपूर : ‘या’ कारणातून हाजी सरवरची हत्या; नागपूर, दिग्रसमध्ये शिजला कट

अंजली दमानिया यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात हे काय चाललंय? कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली? सदा सरवणकरांच्या बंदुकीचा गोळीबार काय, गणपत गायकवाडांचा पोलीस ठाण्यातला गोळीबार काय, नितेश राणेंची खुलेआम धमकी काय, हे सगळं काय चाललंय? गृहमंत्री फोडाफोडीच्या राजकारणात इतके माशगुल झाले आहेत की गुंडगिरीला आळा घालायला त्यांच्याकडे बहुदा वेळच उरलेला दिसत नाही. गुंडांना पाठीशी घालण्याचे हे दुष्परिणाम आहेत. खूपच हादरवून टाकणारी ही घटना आहे.

त्यापाठोपाठ अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, काल संध्यकाळी घडलेली घटना धक्कादायक आहे. राज्यात चालू असलेलं राजकारण आणि अशा प्रकारच्या घटना पाहून प्रश्न पडतोय की, आपल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे का? हत्या आणि गोळीबार करण्यासाठी या लोकांकडे बंदुका कुठून येतात, कशा येतात? या लोकांवर कोणाचाच वचक दिसत नाही. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी, गावागावांमधील भांडणं थांबवण्यासाठी ‘तंटामुक्त गाव’ हे अभियान राबवलं होतं. तसंच अभियान या सत्ताधाऱ्यांनीही आपसांत राबवण्याची गरज आहे. राज्याचे गृहमंत्री पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायला वेळ नाही.