नगर: पीक विम्यासंदर्भातील अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांनी नुकतीच बैठक घेतली. विमा कंपन्यांनी काही दिवसांची मुदत मागितली आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड व ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नगरमध्ये आज, शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज नाशिकमधील दौऱ्यात राष्ट्रवादीकडून स्वागतासाठी लावलेल्या शुभेच्छाफलकांवरून शरद पवार यांचा फोटो गायब झाला आहे, त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचा फोटो लागला आहे. या संदर्भात मुंडे म्हणाले, की ज्या शरद पवारांना आम्ही दैवत मानतो, त्या देवाने आम्हाला भक्तांना फोटो वापरण्यास मनाई केली आहे. कायदेशीर कारवाई करेल असे सांगितले. मग आम्ही काय करायचे? तेव्हा आमच्यावर कायदेशीर कारवाईची वेळ देवावर येऊ नये म्हणून त्यांच्याऐवजी ते ज्यांना गुरू मानत होते, त्या यशवंतराव चव्हाण यांचे छायाचित्र आम्ही लावले. 

Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Eknath Shinde Shivsena Welcomes NCP Congress Leaders in Party
एकनाथ शिंदेंचा शरद पवार व काँग्रेसला दणका, नाशिकमधील मोठ्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
शरद पवारांनी संघाचे कौतुक करताच अजित पवारांच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली खंत, म्हणाले…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
Pune BJP Shiv Sena corporators
शिवसेना नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपमध्ये नाराजी, काय आहे कारण ?
Child dies after falling into sinkhole in nashik
नाशिक : शोषखड्ड्यात पडल्याने बालकाचा मृत्यू
Disagreements in sports over government authority Controversy over highest sports award again
सरकारच्या अधिकारावरून क्रीडाक्षेत्रात मतभिन्नता; सर्वोच्च क्रीडा पुरस्कार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

कांदा व टोमॅटोच्या भावावरून शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवले. या संदर्भातील प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ते म्हणाले, की जेव्हा शेतकऱ्यांना ऐतिहासिक २७१० रुपये भाव दिला गेला, त्या वेळेस माध्यमांना ती बातमी करावीशी वाटली नाही. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व मी अशा तिघांनी बैठक घेतली. आणखी दोन लाख टन कांदा विकत घेण्याचा निर्णय घेतला. या कांद्याला २१५० रुपये भाव देऊन तो विकत घेणार आहोत. हा ऐतिहासिक निर्णय आहे. मात्र, विरोधाला विरोध करायचे व माध्यमे उपद्रव मूल्याला जास्त महत्त्व देऊ लागल्याने उपद्रवमूल्य वाढताना दिसत आहे. त्यामुळेच अशा गोष्टी घडत आहेत, असाही दावा मुंडे यांनी केला.

Story img Loader