scorecardresearch

Premium

VIDEO: अहमदनगरच्या गणेश साखर कारखान्यावरून थोरातांचे विखेंवर गंभीर आरोप, म्हणाले, “मागील वर्षी त्यांनी…”

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील गणेश साखर कारखान्यावरून राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केले.

Balasaheb Thorat Radhakrishna Vikhe Patil
बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगरमधील गणेश साखर कारखान्यावरून राज्याचे विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप केले. “विखेंनी १० वर्षे कारखाना स्वतःकडे ठेऊनही सुरू केला नाही. आता गणेश साखर कारखान्यावर एकाच दिवशी बैठकीची नोटीस देण्यात आली, त्याच दिवशी बैठक आणि लगेच करार वाढवून घेण्यात आला,” असा आरोप बाळासाहेब थोरातांनी केला.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सभासदांचा आग्रह असल्यामुळे मीही त्यात थोडा सहभाग घेत आहे. हा कारखाना १० वर्षे राधाकृष्ण विखेंच्या ताब्यात होता. परंतू त्यानंतरही कारखान्यात काहीही प्रगती झाली नाही. १० वर्षांनंतरही कारखाना सुरू झाला नाही. काही तरी गाळप करायचं आणि त्यानंतर थांबायचं हाच प्रयत्न सातत्याने झाला.”

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

“निवडणूक होत असल्याचं पाहून करार वाढवला”

“या कारखान्याची निवडणूक सुरू असताना पुन्हा एकदा कराराचा निर्णय घेऊन करार वाढवला जात आहे. मागील वर्षी विखेंनी स्वतःहून हा करार थांबवला होता. आता निवडणूक होत असल्याचं पाहून पुन्हा हा करार वाढवला जात आहे. हे योग्य नाही. प्रसंगी कारखान्याचे सभासद न्यायालयातही जातील,” असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

“विखे मोठी माणसं आहेत”

बाळासाहेब थोरात म्हणाले, “विखेंनी गणेश साखर कारखाना चालवायला घेतला होता. तेव्हा आमची अपेक्षा होती की, विखे मोठी माणसं आहेत, ते मोठ्या कारखान्याचे चालक आहेत, त्यामुळे गणेश कारखानाही ते निश्चितपणे चांगला चालवतील. त्यातून गणेश कारखान्याला एक चांगलं आर्थिक जीवन देतील. मात्र, दुर्दैवाने १० वर्षात काहीही घडलं नाही.”

हेही वाचा : साखर कारखाना निवडणुकीत विखे-थोरात प्रथमच आमने-सामने

“त्यांना कारखाना बंदच ठेवायचा आहे का?”

“आता आणखी वर्षे वाढवून घेईन हे काय करणार आहेत. त्यांना कारखाना बंदच ठेवायचा आहे का अशी शंका येणं साहजिक आहे. निवडणूक थांबलेली नाही. कारखान्याचे सभासद निर्णय देतील आणि ते संचालक मंडळ तिथे येईल. निवडणुकीनंतर वज्रमुठचंच संचालक मंडळ येईल, याची मला खात्री आहे,” असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×