राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातून पर्यटनासाठी पर्यटकांचा लोंढा महाबळेश्वर, पाचगणीला येत आहे. या गर्दीमुळे पाचगणी व महाबळेश्वर व परिसरात करोनाचा संसर्ग वाढू लागल्याने महाबळेश्वर, पाचगणी पालिकांनी सर्व पर्यटनस्थळांची ‘नाकाबंदी’ केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक सौंदर्यापासून दूर रहावे लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने जिल्हाबंदी उठवून ई-पास रद्द केले, तसेच हॉटेल व लॉज सुरू करण्यास परवानगी दिल्याने पाचगणीत गर्दी वाढत आहे.  यामुळे  महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील व पाचगणीचे गिरीश दापकेकर यांनी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले व तहसीलदार सुषमा पाटील यांच्या सुचनेनंतर पालिकेची तातडीची बैठक घेऊन पर्यटनस्थळे, उद्याने, बाल उद्याने, खेळांची उद्यानांची नाकाबंदी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blockade in pachgani mahabaleshwar abn
First published on: 10-09-2020 at 00:02 IST