छत्रपती शिवाजी महाराज आमि संभाजी महाराजांच्या विचारांमध्ये आजही देश तारण्याची ताकद आहे असे वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. हिंदुस्थान हे एक राष्ट्र आहे. सगळे राजकीय पक्ष हे आपल्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी काम करत आहेत. राष्ट्राला कणखर भवितव्य नाही. ते प्राप्त करण्यासाठी आणि देशप्रेमाने भारावलेला भेदाभेद विरहित माणूस उभा करण्यासाठी गडकोट मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे असेही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी गडकोट मोहिमेच्या सांगता प्रसंगी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रतापगड ते रायरेश्वर जावळी अरण्यमार्गे आयोजित करण्यात आलेल्या मोहिमेचा समारोप आज जांभळी तालुका वाई या ठिकाणी करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, अभिनेते राहुल सोलापूरकर, डॉक्टर मुकुंद दातार, आमदार सुधीर गाडगीळ, रमेश कोंडे या सगळ्यांचीही उपस्थिती होती. देशासाठी जगावे आणि देशासाठी मरावे हे आजच्या पिढीला शिकवण्याची गरज आहे. सह्याद्रीच्या गडकोटात आणि तेथील वातावरणात मनावर, विचारांवर परिणाम करण्याची ताकद आहे. कन्याकुमारी ते काश्मीर या परिसरातील प्रत्येकाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ठाऊक असलेच पाहिजेत त्यांचे विचार संपूर्ण देशासाठी गरजेचे आहेत असेही मत भिडे गुरुजींनी यावेळी मांडले. तसेच पुढील महिन्यात धर्मवीर संभाजी बलिदान मास राज्यातील ३६ हजार ८०० ग्रामपंचायतींमध्ये पाळला जावा असेही आवाहन त्यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji and sambhaji maharajs thoughts still give strength to the country says sambhaji bhide guruji
First published on: 30-01-2018 at 22:44 IST