आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जागावाटपाच्या मुद्द्यावरून शनिवारी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. औरंगाबादमधील काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीने जागावाटपाबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असा सूर उमटताना दिसला. खासदार राजीव सातव यांनी राष्ट्रवादीने आघाडीसंदर्भातील निर्णय तातडीने घ्यावेत असे सांगितले. त्यामुळे निवडणुकीत कोणासोबत रहायचे आणि कोणाविरुद्ध लढायचे हे चित्र स्पष्ट होईल, असे म्हणत जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक असल्याचे त्यांनी दाखवून दिले. तर दुसरीकडे, आगामी निवडणुकांमध्ये लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना लवकरात लवकर कामाला लागण्याचा सल्ला काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demands to take alliance decision immediately by ncp
First published on: 26-07-2014 at 05:07 IST