राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांच्या प्रश्नांवर सत्ताधारीही जशास तसं उत्तर देताना दिसत आहेत. कधी-कधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली. “अजित पवारांचा धाक कमी झाला आहे. आता सूचना दिल्या तरी अमलबंजावणी होत नाही”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

नाना पटोले काय म्हणाले?

“पुरवणी मागण्या आता आहेत. ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या पुन्हा येणार आहेत, असा अंदाज आहे. सभागृहात एका पेक्षा एक अर्थमंत्री बसलेले आहेत. आता सरकार जे संकेत दाखवत आहे, याचा अर्थ असा आहे की दाल में कुछ काला है, म्हणजे सरकारचं दिवाळं निघालं आहे. मी २०२४ -२०२५ या अर्थसंकल्पातील नियोजन विधेयकासंदर्भात सभागृहात भूमिका मांडत आहे. आम्ही सातत्याने नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करत असतो”, असं पटोले म्हणाले.

हेही वाचा : “चेंबरमध्ये बसून लोकांचं दुःख कळतं का?”, भास्कर जाधव सभागृहात का संतापले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अर्थमंत्री अजित पवार यांच्याबरोबर दोन दिवसांपूर्वी आमची एक बैठक झाली. त्यांनी नियोजन विभागाला सूचनाही दिल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ही गंभीर बाब सभागृहाच्या मांध्यमातून सरकारला मी सांगू इच्छितो. राज्य सरकारने ज्या सूचना दिल्या, त्याची खाली कुठेही अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विविध मतदारसंघात योजनांची अंमलबजावणी करावी लागते. त्यासाठी या आयोगाच्या माध्यमातून केली जाते. मात्र, विरोधकांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या मतदारसंघात कामचं होऊ नयेत. अशा प्रकारे हे सरकार काम करतंय का? असा प्रश्न पडतो. दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सूचना दिल्या होत्या. त्या सूचनांची अंमलबजावणी खाली कुठेही झालेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाक आम्हाला सर्वांना माहिती आहे. मात्र, आता अजित पवार यांचा धाक का कमी झाला? हे कळायला मार्ग नाही”, असा टोला नाना पटोले यांनी अजित पवार यांना लगावला.