पाणी भरण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी तालुक्यातील रामपुरा गावात घडली. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आशाबाई भाऊसाहेब करांडे (११) आणि मन्याबाई काळू गोयकर (१०) अशी या दोन मुलींची नावे आहेत.  रामपुरा शिवारातील शेतात वास्तव्यास असणाऱ्या या मुली सकाळी दहाच्या सुमारास पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या. त्या वेळी एकीचा तोल जाऊन ती पाण्यात पडली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसरीही पाण्यात पडली.  या घटनेची माहिती समजल्यानंतर आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fall in well two girls died in maleaon
First published on: 07-07-2013 at 03:20 IST