जळगाव : जिल्ह्यात सद्य:स्थितीत तापमानाचा पारा वाढला असून, सकाळी आठपासूनच चटके जाणवत आहेत. एप्रिलमध्येच मे महिन्यातील स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फटका केळीसह इतर पिकांना बसत असून शेतीकामेही रखडली आहेत. या एकंदर परिस्थितीत केळीच्या बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ग्रामीण भागात दुपारी शेतीकामे बंद ठेवण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उष्णतेचा कहर एप्रिल अखेपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला होता. जिल्ह्यासह रावेर, यावल या तालुक्यांत तापमानाचा पारा ४२ ते ४५ अंशांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम केळी पिकांवर होऊ लागला आहे. यामुळे केळीचे घड सटकणे, केळी बागेच्या पूर्व-पश्चिमेकडील केळी पीक करपण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांकडून बागेच्या संरक्षणासाठी दोन्ही बाजूंना जाळी, सनची झाडे लावण्यात येत आहेत. काही शेतकरी नवीन प्रयोग करून रोपे वाचविण्याची कसरत करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers struggle to save banana orchards due to rising temperature in jalgaon zws
First published on: 27-04-2022 at 01:08 IST