कोकण किनारपट्टीवर वाढलेले जलप्रदूषण, हवामानाचा लहरीपणा, यांत्रिकी नौकांची वाढलेली संख्या यांचा एकत्रित परिणाम कोकणातील मासेमारीवर होण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ात मत्स्य उत्पादनात मोठी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात आठ हजार मेट्रिक टन घट झाली आहे. जिल्ह्य़ात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शेतीपाठोपाठ आता मासेमारी व्यवसायही धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगड जिल्ह्य़ाला २१० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे शेतीनंतर मासेमारी हा जिल्ह्य़ातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहे. जिल्ह्य़ात ३ हजार ४४४ यांत्रिकी तर १ हजार ४९९ बिगर यांत्रिकी नौका आहेत. या नौकांवर जवळपास तीस ते पस्तीस हजार लोक काम करतात. या व्यवसायातून दरवर्षी साधारणपणे ४५ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन घेतले जात असे. आता मात्र हा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. २०११ -२०१२ मध्ये रायगड जिल्ह्य़ात ४६ हजार ९१२ मेट्रिक टन असणारे मत्स्य उत्पादन, २०१५ -२०१६ मध्ये घटून ३९ हजार ५३ मेट्रिक टनावर आले आहे. म्हणजेच गेल्या पाच वर्षांंत जिल्ह्य़ातील मत्स्य उत्पादनात तब्बल आठ हजार मेट्रिक टनाची घट झाली आहे. पापलेट, सुरमई, िशगाडा, घोळ, शेवंड यांसारख्या माशांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fishing business in raigad district
First published on: 11-12-2016 at 01:19 IST