लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती आहे. पार्थ पवार यांच्या सुरक्षेवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. “घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“आता सुरतमध्ये एक जादू झाली आणि भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. अशा प्रकारची जादू आता होऊ लागली तर सर्वसामान्य लोक काय शिल्लख राहणार. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच एक यावर उत्तर आहे. राज्यात महाविकास आघाडीचे ४८ खासदार निवडून येतील, असे वाटत आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nagpur, Mohan Bhagwat, RSS, Mohan Bhagwat s Security Upgraded, security upgrade, Union Home Ministry, Z Plus security,
मोठी बातमी! मोहन भागवत यांना मोदी, शहांच्या दर्जाची सुरक्षा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
private guards stopped tourists for taking rare bird photo at wetland near palm beach road
पाणथळ जागेवर छायाचित्रणास मज्जाव! नवी मुंबईत विकासकाच्या सुरक्षारक्षकांकडून पर्यावरणप्रेमींची अडवणूक
sanjay raut
“याचा अर्थ महाराष्ट्रातील पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही”, शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवरून संजय राऊतांचं टीकास्र!
Neelam Gorhe, Maha vikas Aghadi, Ladki Bahin yojana,
Neelam Gorhe : महिलांचा सरकारवरील विश्वास उडावा म्हणून षडयंत्र, लाडकी बहीण योजनेवर नीलम गोऱ्हे यांचे विधान
Another mistake in Devendra Fadnavis security
देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत पुन्हा चूक; नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray, MNS attack, MNS attack on Uddhav Thackeray convoy, Maharashtra Navnirman sena, convoy, Thane, coconut attack, Avinash Jadhav, police case, political tensions,
अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर गुन्हा

quiziframe id=30 dheight=282px mheight=417px

हेही वाचा : मतदानाआधीच सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा, ‘या’ घोटाळ्यातून मिळाली क्लीन चिट!

उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला

पार्थ पवार यांच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “मला कळले की, रॉकेट, रणगाडे वैगेरे वैगेरे…काय काय त्यांना देत आहेत. आता घरात काम करणाऱ्यांना पण वाय प्लस, झेड प्लस दर्जाची सुरक्षा देत आहेत. मात्र, सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार होत आहे. पण इकडे गद्दारांची सुरक्षा केली जात आहे”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

अशोक चव्हाण यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे यांची आज नांदेडमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. “अशोक चव्हाण भाजपात गेल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे”, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.