सांगली : गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ हवामानानंतर मंगळवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. मध्यरात्रीही मिरज पूर्व भागासह तासगाव तालुक्याच्या काही भागात विजेच्या कडकडाटासह दमदार अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. अवकाळी पावसाने रब्बी पिकांना दिलासा दिला असला तरी द्राक्ष, उस, भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

मंगळवारी मध्यरात्री मिरज पूर्व भागातील मालगाव, खंडेराजुरी, भोसे, कळंबी, कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण, बोरगाव, तासगाव तालुक्यातील अंजनी, गव्हाण, मणेराजुरी, सावळज परिसरात अवकाळी पावसाने थैमान घातले. तर दुपारी सांगली, मिरजेसह पूर्व भागासह आरग, बेडग, लिंगणूर खटाव परिसरात पावसाने हजेरी लावली.

Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
An increase in the price of silver compared to gold
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात वाढ… हे आहे आजचे दर…
Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….

हेही वाचा – राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता

अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील शाळू, हरभरा, करडई, गहू या पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली असली तरी द्राक्ष, उस, भाजीपाला यांना हा अवकाळी पाऊस हानी पोहचवणारा ठरला आहे. द्राक्षामधील अनुष्का, माणिक चमन या जाती या अवकाळीने घडकुजीला बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर फुलोर्‍यातील द्राक्ष मणी दावण्यासारख्या बुरशीजन्य रोगाला बळी पडण्याचा धोका बळावला आहे. पावसानंतर आज सकाळपासून द्राक्ष बागामध्ये पंपाद्बारे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत होती.

हेही वाचा – ‘आवाहन…’, शरद पवारांचं खुलं पत्र; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख करून म्हणाले…

अवकाळी पावसाने सांगली मिरज शहरात पादचारी व वाहनधारकांचीही तारांबळ उडाली. पदपथावर विक्री करणार्‍यांची माल पावसापासून वाचविण्यासाठी मोठी धांदल उडाली. तसेच मिरज तालुक्यातील मालगाव येथील बावाफन उरूस आणि इस्लामपूर येथील संभूआप्पा उरूस आजपासून सुरू झाला असून उरूसासाठी लावण्यात आलेल्या फिरत्या दुकानदारांचीही पावसाने धांदल उडाली. पावसाने यात्रेकरूच बाहेर पडणार नसतील तर व्यवसाय होणारच नाही अशी शंका एका विक्रेत्याने व्यक्त केली.