प्रदीप नणंदकर

लातूर : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना सोयाबीनचे तेल पुरविले जात असताना राज्यातील ‘आनंदाचा शिधा’मध्ये मात्र आयात केलेले पामतेल दिले जाणार आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

tribal demand for Bhil Pradesh has returned to haunt Rajasthan politics
राजस्थानच्या राजकारणात स्वतंत्र ‘भिल प्रदेश’ राज्याची मागणी का जोर धरू लागली आहे?
economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
mp women burried
रस्त्याच्या बांधकामाला विरोध केल्याने दोन महिलांना मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं; मध्यप्रदेशातील धक्कादायक घटना!
Why is the youth of the state displeased with the contractual recruitment for government posts
शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का?
tigers died in mp graph of tiger deaths increasing in madhya pradesh
मध्यप्रदेशात वाढतो आहे, वाघांच्या मृत्यूचा आकडा, हा रेल्वे ट्रॅक …
Hathras stampede Bhole Baba has divided major parties in Uttar pradesh
हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी ‘भोले बाबा’वर आरोप का नाही? काँग्रेस-बसपा आक्रमक; भाजपा-सपाचा सावध पवित्रा
all party political leaders administrative officers entrepreneurs purchase land in ayodhya
अयोध्येच्या शरयूत हात धुऊन घेण्याची शर्यत; सर्वपक्षीय राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, उद्योजकांकडून जमीन खरेदी
mumbai, Leakage in New MHADA Homes in Vikhroli, Leakage in new mhada houses in vikhroli, New MHADA Homes in Vikhroli, Winners Demand Immediate Repairs and Accountability, vikhroli news, mumbai news,
म्हाडाच्या विक्रोळीतील नव्या कोऱ्या घरांमध्ये गळती, बांधकामावर प्रश्नचिन्ह

राज्य सरकारच्या वतीने दसरा- दिवाळीनिमित्त १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ दिला जाणार आहे. एक किलो साखर, एक किलो तेल आदींचा यात समावेश असून, एक लाख ६६ हजार शिधापत्रिकाधारकांना त्याचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी ५३० कोटी १९ लाख रुपये खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर गेल्या वर्षी ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात आला होता, त्या वेळीही आयात केलेले पामतेल वितरित करण्यात आले होते.

हेही वाचा >>>एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळणार

 यावर्षी पामतेल आणि सोयाबीन तेलाचा भावही ८५ रुपये किलो आहे. असे असतानाही शिधाधारकांना पामतेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘मेक इन इंडिया’चा गाजावाजा सुरू असताना किमान वस्तू पुरविताना तरी याचा विचार करण्याची गरज होती, असे सांगण्यात येत आहे. बाजारपेठेत या हंगामातील नवीन सोयाबीन दाखल होत असून, सोयाबीनचा हमीभाव ४ हजार ६०० प्रतििक्वटल आहे, तर लातूर बाजारपेठेत ४ हजार ५०० रुपयांनी सोयाबीन विकले जात आहे. सोयाबीनची विक्री हमीभावपेक्षाही कमी भावाने होत आहे. हा भाव चार हजार दोनशेपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारच्या वतीने सोयाबीन तेल शिधापत्रिकाधारकांना दिले असते तर सोयाबीनचे भाव स्थिर होण्यात मदत झाली असती. राजस्थान सरकारने मात्र सोयाबीन तेल वितरित करण्याचा निर्णय घेतला.

‘परदेशी तेलवाटप का?’

आपल्या देशातील वस्तूला प्रोत्साहन देण्याची गरज असताना सोयाबीन तेलाऐवजी आयात केलेले तेल कशासाठी दिले जाते, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. सोयाबीनची विक्री हमीभावापेक्षाही कमी भावाने होत असताना या निर्णयाने आणखी दरघसरणीची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.