सांगली : देशाचे संरक्षण करणार्‍या सैनिकांना अधिक आत्मबल मिळावे यासाठी मिरजेतील न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींनी राखी पाठविण्याचा उपक्रम स्तूत्य असल्याचे मत कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंगळवारी व्यक्त केले. रक्षाबंधनाचे महत्व लक्षात घेऊन सीमेवर लढणार्‍या सैनिकांसाठी आज न्यू इंग्लिश स्कूलच्या मुलींनी स्वहस्ते तयार केलेल्या राख्या पाठविण्यात आल्या.

हेही वाचा : “कांद्यामुळे काँग्रेसचं सरकार गेलं, शेतकऱ्याला…”, शिंदे गटाचा मोदी सरकारला घरचा आहेर

Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. विनोद परमशेट्टी, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील, डॉ. विकास पाटील, बाबासाहेब आळतेकर, शाळेचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चव्हाण आदी उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन करीत पाहुण्यांचे स्वागत केले. मुलांना शालेय वयातच शिस्त लावण्याचे आणि देशाभिमान जागृत करण्याचे काम शिक्षकाकडून होत असल्याबद्दल श्री. फुलारी यांनी कौतुक केले.