राज्यात शेतकरी आत्महत्या करीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाची वाट पाहात असल्याची टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्या तुलना रोमन राजा नीरोशी केली. मंगळवारी विधानसभेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना जयंत पाटील यांनी युती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
जयंत पाटील म्हणाले, राज्यातील शेतकरी सध्या अत्यंत विषम परिस्थितीचा सामना करतो आहे. मात्र, राज्य सरकारला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नाही. आम्ही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी करतो आहोत. पण त्याकडेही सरकार लक्ष देण्यास तयार नाही. संपूर्ण रोम जळत असताना तत्कालिन राजा नीरोने केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. त्याप्रमाणे फडणवीस हे देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आदेशांची वाट बघत असल्याची टीका त्यांनी केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या चर्चेमध्ये राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारवर चौफेर टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
जयंत पाटील यांच्याकडून फडणवीसांची तुलना नीरोशी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी युती सरकारवर चौफेर टीका केली
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 16-12-2015 at 11:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayant patil compares devendra fadnavis with roman emperor nero