विधिमंडळात मंगळवारी (२७ फेब्रुवारी) मनोज जरांगेंचे उपमुख्यमंत्र्यांवरील आरोप, त्यांची भूमिका आणि मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी जेसीबी लावण्यात आल्या. एवढे पैसे कोठून आले. मनोज जरांगे हे खासदार शरद पवार यांच्या संपर्कात होते. आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर बैठका झाल्या, असा दावा भाजपाच्या नेत्यांनी केलाय. या आरोपांनंतर मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाणार आहे. यावरच आता खुद्द मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिलीय. ते संभाजीनगरात आज (२७ फेब्रवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

“फडणवीसांसाठी मी एक काटा आहे”

मनोज जरांगे म्हणाले की, माझ्याविरोधात एसआयटीची चौकशी लावण्यात आली. मी गरीब मराठ्यांचे काम करत आहे. देवेंद्र फडणवीस हे सत्तेचा वापर करत आहेत. त्यांनी काय करायचं ते करू द्या. कारण माझा कोठेही दोष नाही. मी मागेच मराठा समाजाला सांगितलं की फडणवीसांसाठी मी एक काटा आहे. सरकार आणण्यासाठी मला त्यांना गुंतवायचे आहे.

cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

मी कोठेच गुंतू शकत नाही, मला कोणाचाही पाठिंबा नाही

“मी कोठेही जायला तयार आहे. अरे तुम्ही कोणतीही चौकशी करा. मी कोणत्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहे. मी भेकड असतो तर गप्प बसलो असतो. मी कोठेच गुंतू शकत नाही. मला कोणाचाही पाठिंबा नाही. मला कोणीही पैसे दिलेले नाहीत. मला कोणीही फोन केलेला नाही. तुम्ही एसआयटी चौकशी करणार असाल तर तुमचेच मला आलेले फोन बाहेर येतील. त्यांनी मला अनेकवेळा कॉल केलेले आहेत. मग मी पण ते कॉल बाहेर काढतो. होऊन जाऊ द्या मग. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. माझ्यासाठी जात हे दैवत आहे. मला तुम्ही आता बोलावलं तरी मी सलाईन हातात घेऊन चौकशीसाठी येईल,” अशी भूमिका जरांगे यांनी घेतली.

मराठा समाज एवढा कमजोर आहे का?

“मला माहिती आहे मी निर्दोष आहे. माझ्याविरोधात काहीच सापडू शकत नाही. मला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नाही. माझ्या स्वागतासाठी मराठा समाजाने जेसीबी लावलेल्या आहेत. मराठा समाज एवढा कमजोर आहे का? कष्ट करतो. त्यामुळे काहीही अडचण नाही,” असंदेखील विधान जरांगे यांनी केलं.

गिरीश महाजन यांचे नाव घेत मोठा दावा

“एसआयटी चौकशी करणार असाल तर सर्व चौकशी करा. पोलिसांचीही चौकशी केली पाहिजे. अगोदर हल्ला कोणी केला, हेही तपासा. हल्ल्याचा आदेश देणाऱ्या मंत्र्यांचीही चौकशी करा. गिरीश महाजन यांनी कॉल केला होता. ती रेकॉर्डिंग बाहेर काढा मग. गृहमंत्र्यांपर्यंत सगळेच गुंतून जातील,” असा दावा जरांगे यांनी केला.