नागपूरमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी घटना मंगळवारी पहाटे घडली. खरबी येथील दोन गुडांची टोळीयुद्धातून हत्या करण्यात आली असून या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून टोळीयुद्धातून हत्या झाल्याची आठवडाभरातील दुसरी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय बनोदे, बादल शंभरकर, राजेश यादव हे तिघे मंगळवारी पहाटे दिघोरी उड्डाणपुलावरुन खरबी येथे दुचाकीवरुन जात होते. यादरम्यान लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ त्यांना एका स्विफ्ट कारने धडक दिली. या धडकेमुळे तिघेही दुचाकीवरुन खाली पडले. यानंतर कारमधून चार हल्लेखोर उतरले. त्यांनी लोखंडी रॉडने तिघांना मारहाण केली. संजय आणि बादलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी झालेल्या राजेश यादवला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. कार बंद पडल्याने हल्लेखोरांनी कार तिथेच सोडून पळ काढला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur double murder gangwar in kharbi area
First published on: 19-12-2017 at 16:17 IST