यंदा राज्यात दुष्काळ आहे, मराठवाड्यात एक मूठ धान्य आणि एक पेंडी चारा प्रत्येकाने दिला तर मराठवाड्यातील जनावरांना आणि माणसांना हातभार लागेल. नाइलाजाने गावाकडील लोक आज शहरात येत आहेत, ती भिकारी नाहीत. त्यांना भिकाऱ्यासारखी वागणूक देऊ नका असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. दिल्लीत शेतकरी मोर्चा निघाला. हे पाहता शेतकऱ्यांना संस्थांनी मदत करावी. कोणतेही सरकार मदत करते मात्र ती कमी पडते तेव्हा सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत करायला हवी असेही ते यावेळी म्हणाले.

राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आणि ग्रीन थंब या संस्थेच्या माध्यमातून खडकवासला बॅकवॉटरमधील गाळ साफ करण्याच्या चौथ्या टप्प्याचे आज उद्घाटन करण्यात आले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते हे उदघाटन झाले. यावेळी नाम फाऊंडेशनकडून पाच पोकलन या उपक्रमासाठी देण्यात आले. आपण निसर्गाशी छेडखनी केली की निसर्ग आपल्याला तसेच देणार अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
mumbai, Heroin, Police Arrest, 26 Year Old, Youth, Rs 54 Lakh, Mahim, Raheja Flyover, drugs, crime news, marathi news,
मुंबई : ५४ लाखांच्या हेरॉइनसह एकाला अटक

आपल्याकडे राम मंदिरावर चर्चा होते, मात्र दुष्काळावर चर्चा होत नाही असा प्रश्न विचारला असता, नानांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. कुणी काय करायचे हे त्यांच्यावर आहे. मला जे करावेसे वाटते ते मी करतो. गरीब माणसाच्या तोंडात रोज दोन घास गेले तर ते मला देवळात गेल्यासारखेच वाटेल त्यामुळे तुम्हाला मंदिर बांधयाचे असेल तर बांधा. पण मला जे काम करायचे आहे मी करत आहे असेही ते म्हणाले.