काही दिवसांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे एकदिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. तेव्हा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. “तेजस्वी यादव आणि मी एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे वातावरणीय बदल आणि पर्यावरण विषयावर चर्चा झाली,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.

यावरून आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आदित्य ठाकरेंना ‘पप्पू’ म्हणत टीका केली आहे. “छोटे पप्पू महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेले होते. महाराष्ट्रातील लोकांवर यांचा भरवसा नाही का? महाराष्ट्राने आतापर्यंत दुसऱ्यांना प्रेरणा दिली, याचा विसर पडला का? राज्यातील नेत्यांनी कधीही दुसऱ्यांसमोर हात पसरला नाही,” असेही नवनीत राणा म्हणाल्या.

What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
sunil tatkare on raj thackeray support,
“रायगडमध्ये मनसेची मोठी ताकद, त्यामुळे…”; राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया
Shivsena UBT Criticized Raj Thackeray
“राज ठाकरेंनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, कोल्ह्याला द्राक्षं आंबट”, म्हणत शिवसेना उबाठा नेत्यांची बोचरी टीका

हेही वाचा : “नितू, निलू आगाऊ लेकरं,” सुषमा अंधारेंचा खोचक टोला; म्हणाल्या, “नारायण राणेंनी संस्कार…”

उद्धव ठाकरेंच्या चिखलीतील सभेवरूनही नवनीत राणांनी हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे फक्त टीका करण्यासाठी सभा घेतात. ते म्हणतात रस्त्यावर उतरा, पण आपण कधी मातोश्री सोडून शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहात. शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाहीतर, तुम्ही अडीच वर्षात काय केलं, याच स्पष्टीकरण द्यायला हवे,” असेही नवनीत राणा यांनी म्हटलं.