उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात तब्बल २७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यात अपक्षांची संख्या सर्वाधिक आहे. अपक्ष उमेदवारांना मतमोजणीत मदत व्हावी, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षासह नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उमेदवार अपक्ष आणि मतमोजणी प्रतिनिधी मात्र राष्ट्रवादीचे, असे चित्र उस्मानाबादेत पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड, बसपचे पद्मशील ढाले व अपक्ष उमेदवार रोहन देशमुख या चौघांची नावे वगळता अन्य २३ उमेदवारांची नावेही उस्मानाबादकरांच्या ध्यानात नाहीत. मतदारांना ज्ञात नसलेल्या अशा अनोळखी अपक्ष उमेदवारांच्या दिमतीला मात्र राष्ट्रवादीची भलीमोठी फौज सज्ज झाली आहे. यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह नगरसेवक व काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उत्साह दाखवला आहे. समाजवादी पक्षाचे उमेदवार अॅड. शैलेंद्र यावलकर यांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून सुरेश देशमुख यांनी जबाबदारी स्वीकारली, तर अपक्ष उमेदवार नवनाथ उपळेकर यांचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून राष्ट्रवादीचे तालुका समन्वयक बाळासाहेब घुटे जबाबदारी पार पाडत आहेत. उपळेकरांच्या पारडय़ात पडणाऱ्या मतांची बेरीज मोजण्यास राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक माणिक बनसोडे, अफरोज पिरजादे, मनोद्दीन पठाण, अय्याज शेख, कचरू घोडके आदींनी पुढाकार घेतला आहे.
शिवसेनेच्या गायकवाड यांच्या नावाशी साधम्र्य असणारे अपक्ष उमेदवार रवि गायकवाड यांच्या मदतीसही राष्ट्रवादीचे कार्यकत्रे सरसावले आहेत. जि.प. सदस्य नानासाहेब जाधवर, नगरसेवक खलिफा कुरेशी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष भारत खोसे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पंडित टेकाळे यांच्यासह धनंजय वाघमारे, रामहरि िशदे, बालाजी आडसूळ हे कार्यकत्रे रवि गायकवाड यांच्यासाठी काम करणार आहेत.
िहदुस्थान निर्माण दलाच्या उमेदवार पुष्पाताई तरकसे यांचे मतमोजणी प्रतिनिधी म्हणून भागचंद बागरेचा, अक्षय ढोबळे, धीरज वीर, प्रदीप सुरवसे यांनी जबाबदारी स्वीकारली. राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचे कार्यकत्रेही अपक्षांच्या दिमतीला धावले आहेत. अपक्ष तुकाराम गंगावणे यांचे प्रतिनिधी म्हणून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी भार उचलला. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडे संशयाच्या नजरेतून पाहणाऱ्या राष्ट्रवादीने मतमोजणी प्रतिनिधींच्या यादीत एकाही काँग्रेस कार्यकर्त्यांला सहभागी करून घेतले नाही.
‘.. त्यामुळेच हा पर्याय’
मतमोजणी प्रतिनिधींची संख्या मर्यादित व कार्यकर्त्यांची संख्या जास्त. त्यातच कार्यकर्त्यांमध्ये मतमोजणीसाठी उपस्थित राहण्यासाठी प्रचंड उत्साह आहे. अपक्ष उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची वानवा. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्तिगत पातळीवर असा पर्याय निवडला असेल, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सांगितले.