राहाता : राज्यातील महाआघाडी सरकारने  बिलाअभावी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले, याविषयी आपण प्रश्न उपस्थित केल्यानंतर वीज तोडली जाणार नाही, असा निर्णय सरकारला घ्यावा लागला. आघाडी सरकार फक्त घोषणा करते, इथेही अनेक जण निळवंडेच्या गप्पा मारतात, मग ३० वर्षांपूर्वी कोठे होते? असा सवाल माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी  केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डी मतदारसंघातील केलवड, खडेवाके, पिपरी लोकाई, नांदुर्खी, दहेगांव, वाळकी कोऱ्हाळे, कोऱ्हाळे आडगाव येथील राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थीना विविध साहित्य वितरण कार्यक्रमात आमदार विखे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, उत्तर प्रदेश येथील डॉ. एन सिंग, डॉ. आर. के. श्रीवास्तव, सुभाष गमे, पी.डी. गमे, काळू  रजपुत, गणीभाई शेख, सचिन मुरादे सतीश बावके, बाळसाहेब  डांगे, उत्तमराव डांगे, संतोष ब्राह्मणे, सुनील गमे, नामदेव घोरपडे, नकुल वाघे, पूनम बर्डे, संगीता कांदळकर, बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilwande radhakrishnavikhen questionopposition distribution materials beneficiaries vayoshri yojana amy
First published on: 21-03-2022 at 00:16 IST