रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील खचलेल्या रस्त्याची अद्याप डागडुजीही करण्यात आली नसल्याने हा टापू वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या जागा संपादित करण्यात आल्या त्यापैकी काही जागांच्या मालकी हक्काचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परशुराम घाटातील जमीन हीदेखील मालकी हक्काचा तिढा न सुटलेल्या जागांपैकी एक आहे. त्यामुळे या घाटातील चौपदरीकरणाचे काम ठेकेदार कंपनीने अद्याप सुरू केलेले नाही. नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे आधीच धोकादायक असलेल्या घाटातील रस्त्याचा काही भाग जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खचला होता. त्या वेळी येथील पाण्याच्या लोंढय़ामुळे दरड कोसळून तिघेजण प्राणाला मुकले. घाट वाहतुकीला बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणच्या गटारात भराव टाकून खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात आली होती. पावसाळा संपताच रस्ता खचलेल्या ठिकाणी डागडुजी करणे गरजेचे होते. महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना देऊन हे काम युद्धपातळीवर करून घ्यायला हवे होते. मात्र ठेकेदाराने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parashuram ghat dangerous for transportation zws
First published on: 25-11-2021 at 00:04 IST