अलिबाग- खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात दोन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. यामुळे जांभिवली गावावर शोककळा पसरली आहे. आराध्या संजय गावडे वय ५ आणि आरव विजय गावडे वय ५ अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहे. दोघेही चुलत बहीण भाऊ आहेत. मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली. दोघेही आपल्या आई आणि काकी सोबत नेहमी प्रमाणे धावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी दोघेही नदीत अंघोळीसाठी उतरले. थोड्यावेळाने आई आणि काकी सोबत घरी आले. मात्र नंतर पुन्हा दोघे घरात दिसत नसल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मुले खेळत खेळत पुन्हा नदीवर गेले नाही ना हे पाहण्यासाठी गेले असता, आराध्य नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसली. तर आरव हा पाण्यात चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला. हेही वाचा - शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… शिक्षण विभागाचा निर्णय काय? हेही वाचा - राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले… दोघांनाही ग्रामस्थांनी ताततडीने चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता. दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.