मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून शिंदेंच्या शिवसेनेतील खासदार गजानन कीर्तिकर आणि नेते रामदास कदम यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर रामदास कदमांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली.

रामदास कदम म्हणाले, “भविष्यात कुठलेही वाद झाले, तर मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करावी. थेट प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाता नये, अशी विनंती मुख्यमंत्र्याकडे केली आहे. तशा सूचनाही कीर्तिकरांना देण्यास सांगितलं आहे. दोन नेतेच आपापसांत भांडतात, हे चित्र भूषणावह नाही.”

SambhajiRaje Chhatrapati
SambhajiRaje Chhatrapati : “केंद्रात अन् राज्यात तुमचं सरकार, मग स्मारक का झालं नाही?”, संभाजीराजे छत्रपतींचा राज्य सरकारला सवाल
latur student food poisoning news
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ५० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; उपचार…
Ramraje Naik Nimbalkar, Ranjit Singh Naik Nimbalkar,
तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या, अपक्ष लढू; रामराजे नाईक निंबाळकरांचे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आव्हान
Highway between Navi Mumbai and Bangalore with airport landing facility
नवी मुंबई ते बंगळूरू दरम्यान विमान उतरण्याची सुविधा असलेला महामार्ग; नितीन गडकरी यांची घोषणा
Guardian Minister Suresh Khade associate Mohan Wankhande in Congress
पालकमंत्री सुरेश खाडे यांचे सहकारी प्रा. मोहन वनखंडे काँग्रेसमध्ये
UNESCO team appreciated servants for preservation of Pratapgad and tradition of festivals
प्रतापगडाच्या संवर्धनाचे ‘युनेस्को’कडून कौतुक
Under CM Majhi Ladki Bahin Yojana 22 applications filed in Barshi taluka on forged documents
बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न बार्शीत २२ प्रकार उजेडात; बँक खातेही परराज्यातील
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
Devendra Fadnavis On PM Modi
Narendra Modi : पंतप्रधान मोदी नवरात्रीत करतात कडक उपवास; देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते फक्त…”

“पक्षासाठी मी कफन बांधून लढलो”

“माझ्यावर गद्दारीचा शिक्का असल्याचं बोलणं आणि कुठलीही शहनिशा न करता मला राजकरणातून संपवण्यासाठी प्रेसनोट काढणं कितपत योग्य आहे? माझी हत्या करण्याची सुपारी अनेकांनी घेतल्या होत्या. पण, पक्षासाठी मी कफन बांधून लढलो आहे,” असं रामदास कदमांनी म्हटलं.

“मी कधीच कुणावर कमरेखाली हल्ला केला नव्हता”

“मी कांदिवलीचा शाखाप्रमुख होतो. माझ्या कामांवरती कीर्तिकर विधानसभेत निवडून आले होते. आता ३३ वर्षानंतर मी त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा साक्षात्कार झाला. मी कधीच कुणावर कमरेखाली हल्ला केला नव्हता. अनंत गिते आणि माझ्या भावाला निवडणुकीत पाडल्याचं कीर्तिकरांनी सांगितलं. मग बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. ज्याचं जळतं त्याला कळतं. तुम्हीतर कुठं स्वच्छ आहात?” असा संतप्त सवालही कदमांनी कीर्तिकरांना विचारला आहे.

“…तर मला काहीही अडचण नाही”

“भविष्यात कुठलेही आरोप करायचे नाहीत. तसं काही वाटलं, तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची, असं ठरलं आहे. उत्तर-पश्चिममधून गजानन कीर्तिकर निवडणूक लढत असतील, तर मला काहीही अडचण नाही. मी त्यांच्या प्रचारासाठी सर्वात पुढे असेन,” असं रामदास कदमांनी स्पष्ट केलं.