“सत्ता वाईट असते. मी भोगली आहे. माझी गाडी आली की, प्रत्येक तालुक्यात मागून दहा-बारा गाड्या लागायच्या. एक किलोमीटर पर्यंत रांग दिसायची. मला वाटायचं, माझं वजन खूपच वाढायला लागलंय. मंत्रीपद गेलं. तसं गाडी पण गेली आणि गाडीवाला पण गेला. मी एकटाच राहिलो. आधी मला रात्री एक-एक वाजेपर्यंत फोन यायचे आणि मी उचलायचो. आता मी त्यांना फोन केले तर कुणी उचलतही नाही. हे खूप वाईट”, अशी खंत माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली.

कोल्हापूर मधील हातकंणगले लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते यांच्या प्रचार सभेत बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी आपल्या ग्रामीण शैलीत तुफान टोलेबाजी केली. सत्तेचे साईड इफेक्ट सांगत असताना त्यांनी स्वतःवरही विनोद केले.

Sharad Pawar criticizes Amit Shah regarding violation of law
‘भ्रष्टाचाराचा सुभेदार ’ म्हणणारे गृहमंत्री कायद्याचे उल्लंघन करणारे तडीपार;  शरद पवार यांचा अमित शहा यांच्यावर पलटवार
A letter from the people of Nagpur on the occasion of Devendra Fadnavis birthday nagpur
“उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आपण नागपूरकरांना वाळीतच टाकले…” देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या ‘त्या’ पत्राची सर्वत्र चर्चा
eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
union home minister amit shah likely to kolhapur for inauguration with condition
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती
Union Minister Nitin Gadkari Goa Speech
नितीन गडकरी यांनी टोचले भाजपा नेत्यांचे कान,”चांगले दिवस आले की आपण जुन्या काळातला संघर्ष…”
ganesh naik waiting for about two and a half hours to meet minister uday samant
गणेश नाईक अडीच तास ताटकळत; मुख्यमंत्र्यांच्या खात्यावर गंभीर आरोपांनंतर सामंतांशी चर्चेसाठी प्रतीक्षा
Criticism of Eknath Shinde government regarding Rabindra Waikar investigation closed by the ed print politics news
खासदार वायकर यांना अभय; विरोधकांची टीका; सोमय्या कुठे गेले, काँग्रेसचा सवाल
India boycott of PM speech Modi Dhankhad criticize opponents
सभात्यागामुळे सत्ताधाऱ्यांना बळ; पंतप्रधानांच्या भाषणावर ‘इंडिया’चा बहिष्कार; मोदी, धनखड यांची विरोधकांवर टीका

“भाजपाला ४०० पार व्हायचं असेल तर पाकिस्तान, अफगाणिस्तान…”, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा टोला

सदाभाऊ म्हणाले, २०१९ साली दुसरं (मविआ) सरकार आलं. मी मुंबईवरून माझी एक बॅग घेऊन गावाकडं आलो. गावात आल्यावर नेहमीप्रमाणे खुर्ची टाकून बसलो. एखाद्या गाडीची लाईट चमकली की, मला वाटायचं कुणीतरी माझ्याकडं आलंय. पण कुणीही साधी गाडीची काचही खाली करायचं नाही. हा अनुभव खूप वाईट होता. सत्ता असली की सगळे मागे पळत असतात.

“मंत्री झाल्यावर मी माझ्या मुलांसोबतही भांडण करायचो. मध्यरात्री जरी कुणी घरी आलं तरी त्यांना भेटायचो. मुलांनाही सांगायचो कुणालाही न भेटता पाठवू नका. लोकं घरी आलो की, त्यांना लसणाची चटणी, दही, ठेचा आणि भाकरी खाऊ घालोयचो. लोकही म्हणायचे, तुमच्यासारखा मंत्री कधी बघितला नाही. माझ्या बंगल्यावर मी हॉलमध्ये झोपायचो, पण माझ्या घरात कार्यकर्त्यांचा राबता असायचा. बंगल्यावरचे स्वयंपाकी थकून जायचे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला खाल्ल्याशिवाय सोडायचो नाही. हे कार्यकर्ते पुढे कामाला येणार, असं म्हणायचो. पण सत्ता गेली अन् कुणीच काही कामाला आलं नाही. साधं चहा प्यायलाही कुणी बोलवंत नाही”, अशीही खंत सदाभाऊ यांनी व्यक्त केली.

“सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…

राजू शेट्टींबरोबर असतो तर दारिद्र रेषेखाली असतो

मी जुन्या शेतकरी नेत्याचे नाव आता घेणार नाही. पण त्यांनी मला कधीही मंत्री किंवा आमदार होऊ दिले नाही. २०१४ साली आम्ही एनडीएत असताना एकदा दिल्लीला जाण्याचा योग आला. तिथे अमित शाह यांच्याबरोबर बैठक होती. त्या बैठकीत मी माझ्या मंत्रिपदाबाबत बोललो. तेव्हा अमित शाह म्हणाले की, राजू शेट्टी यांनी शेतकरी संघटनेतून कुणालाही मंत्री न करण्याचा निरोप दिला आहे. त्यावेळी मला धक्काच बसला. मग त्यानंतर कसा तरी त्या संघटनेतून निसटलो आणि मंत्री झालो. नाहीतर माझं नाव कायम दारिद्र रेषेखालीच राहिलं असतं.