मुंबई : राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत  प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून  पािठबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविण्याचे जाहीर केलेले कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश करावा. त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप संभाजीराजे यांना देण्यात आला होता. शिवसेनेच्या एका मंत्र्याने संभाजीराजे यांची भेटही घेतली. संभाजीराजे हे शिवसेनेत प्रवेश करण्यास तयार नाहीत. याउलट महाविकास आघाडीकडील अतिरिक्त मते आपल्याला द्यावीत, असा प्रस्ताव त्यांनी शिवसेना व राष्ट्रवादीकडे दिला आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही ३१ तारखेपर्यंत आहे.

Thackeray group, resign, Thane,
ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Decision of school holiday on 26th July by administration in Pune pune
… म्हणून २६ जुलै रोजीच्या शाळा सुट्टीचा निर्णय घ्यावा लागला?
nashik mp rajabhau waje
राजाभाऊ दिल्लीत, माणिकराव मुंबईत, हे ठरवून घेतले का ? खासदार सत्कार सोहळ्यात जुगलबंदी
sambhajiraje chhatrapati (2)
Vishalgad : “स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे विशाळगडावर…”, संभाजीराजेंचा दावा; नेमका रोख कोणाकडे?
vishalgad incident failure of district administration and police says mp shahu chhatrapati
विशाळगडची घटना जिल्हा प्रशासन, पोलिसांचे अपयश – शाहू छत्रपती यांचा आरोप
sakal hindu samaj, Kolhapur,
विशाळगड अतिक्रमण प्रश्नी संभाजीराजेंचा राजकीय हेतू कोणता? कोल्हापुरात सकल हिंदू समाजाची विचारणा
Vishalgad, meeting, Boycott,
विशाळगड अतिक्रमणांबाबत दिखाऊ प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार – संभाजीराजे छत्रपती
delhi shahu maharaj statue
कोल्हापूर: दिल्लीतील शाहू महाराजांचा पुतळा बदलण्याचा निर्णय; भाजपाचा आनंदोत्सव

राज्यसभेच्या सहापैकी दोन जागा लढविण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. एका जागेवर संजय राऊत यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. भाजपच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.