मुंबई पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवण्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न केला होता. यावेळी शिंदे आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, सध्या पालिकेतील सर्वच पक्ष कार्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे. या घटनेनंतर शिंदे आणि ठाकरे गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. खरी शिवसेना कोणाची याबाबतचा निकाल आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयांवरील निर्णय घेतला जाईल, असे शिंदे गटातील नेते म्हणत आहेत. दरम्यान याच मुद्द्यावर बोलताना ठाकरे गटातील नेते संजय राऊत आक्रमक झाले आहेत. ते आज माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> ‘विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची स्वाक्षरी का नाही?’ भास्कर जाधव म्हणाले, “ज्यावेळी हा प्रस्ताव…”

A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

“हिंमत असेल तर स्वत:चं काही निर्माण करा. ते नाव शिवसेने वापरत आहेत. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते असल्याचे सांगत आहेत. शिवसेना पक्षाची कार्यालयेदेखील आमचीच आहेत, असे म्हणत आहेत. मग तुम्ही काय केलं? स्वत:च्या मुलांना जन्म द्या,” असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरही भाष्य केले. “बेळगावसह सीमा भाग हा केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी का होत आहे? तेथील सरकार, कानडी संघटना मराठी माणसांवर अन्याय करत आहेत. तिथल्या सरकारने मराठी माणसांना संरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयाने सीमाप्रश्नी ‘जैसे थे’चे आदेश दिलेले आहेत. मात्र हा आदेश पाळला जात नाही. म्हणूनच हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी केली जात आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा >>> विश्लेषण: अहमदनगरचं नामांतर ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ करण्याचा प्रस्ताव, पण अहमदनगर हे नाव नेमकं कुणामुळे पडलं?

“कर्नाटकने मराठी भाषा तसेच मराठी माणसाला संरक्षण द्यावे. त्यानंतर आम्ही आमची मागणी मागे घेऊ. याउलट मुंबई देशाची आर्थिक राजधानी असली तर महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबईत सर्व प्रांतातील लोक आनंदाने राहतात. येथे कानडी बांधवही राहतात. मात्र आम्हाला त्यांची अडचण नाही. मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करा म्हणणारे लोक मुर्ख आहेत,” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.