राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर नितेश राणे यांनी ट्वीट करत खोचक शब्दात टीका केली होती. यांची श्रद्धा औरंगजेबावर आहे, हे केव्हाच सिद्ध झालं आहे, असं ते म्हणाले होते. याबाबत अजित पवारांनी विचारलं असता, टिल्ल्या लोकांवर बोलायची गरज नाही, त्यांना आमचे प्रवक्ते उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊतांनीही राणेंवर टीका करताना टोला लगावल्याचे दिसून आले.

हेही वाचा – “परत सांगतोय नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…” संजय राऊतांनी एकेरी भाषेत व्यक्त केला संताप!

Why you must never drink fruit juice on an empty stomach
तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फळांचा रस पिता का? उपाशीपोटी फळांचा रस का पिऊ नये? डॉक्टरांनी सांगितले कारण…
Arvind Kejriwal Mango eating Controversy How Much Calories and Sugar Does One Mango has
केजरीवालांनी आंबा खाल्ल्याने वाद; डायबिटीक रुग्णांनी आंबा खाल्ल्याने काय होईल? १ वाटी आंब्यात काय दडलंय, बघा
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?

संजय राऊत म्हणाले, “अजित पवारांनी फार समर्पक अशी उपमा दिलेली आहे. यांची(राणेंची) बुद्धी तेवढीच आहे टिल्ली. हा प्रश्न टिल्ल्या शरीरयष्टीचा नसून टिल्ल्या बुद्धीचा आहे. मी अशाप्रकारची भाषा कधी वापरत नाही. पण आता वापरली आहे. या जबाबदार सर्वस्वी नारायण राणे हा माणूस आहे आणि यापुढे जर तो बोलत राहिला, तर मी त्याला पूर्ण नागडा करेन. ये तुझी पोरं येताय तर पोरांना येऊ दे, तू येतोस तर तू ये. ये मैदानात, केंद्राची सुरक्षा घेऊन फिरतोय, हिंमत आहे तर एकटा फिर. स्वत:ला मोठा भाई समजतोस.”

अजित पवार काय म्हणाले होते? –

अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानानंतर भाजपाकडून अनेक ठिकाणी निर्देशने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिले. तसेच यावेळी पत्रकारांनी त्यांना नितेश राणेंनी केलेल्या टीकेबद्दल विचारले असता, ‘टिल्ल्या लोकांनी सांगण्याची गरज नाही. त्यांची उंची आणि झेप किती, त्यांना मी कशाला उत्तर देऊ? त्यांना उत्तर आमचे इतर प्रवक्ते देतील, असं ते म्हणाले होते.