Santosh Deshmukh बीडमधल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी एका महिलेला तयार करण्यात आलं होतं. या महिलेची आठ दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. या आरोपामुळे पुन्हा एकदा या प्रकरणी खळबळ उडाली आहे.

काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?

गुंड संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या ?

संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार आसलेली कळंब शहरातील द्वारका नगर मधे राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळतंय. या महिलेची ७ ते ८ दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत.

कुठल्या कारणाने हत्या झाली? अन बीड पोलीसांना ही बातमी कळली अन ते घटना स्थळी पोहचल्यावर नंतरच तेथील रहिवासी व स्थानिक पोलिसांना कळली व अजून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतिक संबधातून हत्या झाली अशी चर्चा सध्या सुरू आहे.

पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत-दमानिया

या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करीत आहेत. असं असलं तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे. शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना २ दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीस व स्थानिक पोलीसानी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना आढळला. व मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम केलं व अंत्यविधी ही उरकला या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. ही महिला अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची आणि त्यासाठी ती खाली दिलेल्या नावांचा वापर करायची

१)मनीषा आकुसकर आडस

२)मनीषा बिडवे कळंब

३)मनीषा मनोज बियाणी कळंब

४)मनीषा राम उपाडे अंबाजोगाई

५)मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी</p>

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशी पोस्ट अंजली दमानियांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या ९ डिसेंबरला करण्यात आली. हिवाळी अधिवेसन आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन या दोहोंमध्ये हा विषय गाजला. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात हा विषय उपस्थित केला होता आणि यावरही भाष्य केलं. आता यानंतर अंजली दमानियांनी संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी महिलेला तयार करण्यात आलं होतं असा आरोप केल ाहआ.े