वर्धा जिल्ह्यातील हिंगणगावमध्ये नाव उलटून झालेल्या अपघातात सात शेतमजूरांच्या मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही पाच मजूर बेपत्ता असल्याचे समजते.
कान्हापूर परिसरातून शेतीचे कामे उरकून दोन नौकांमधून तीस मजूर हिंगणगावाला परतत होते. वना नदीत विसर्जन घाटाजवळच्या मूर्तीच्या चबूतऱयाला आदळून या नौका उलटल्या. त्यातील सोळा शेतकरीमजुर पोहता येत असल्यामुळे बचावले. परंतु, अपघातात सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृत्यूंपैकी दोघांची ओळख पटलेली असून उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आलेले नाही. तसेच अपघातातील मृतांच्या आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संग्रहित छायाचित्र)