लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील तब्बल २४३ विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात मुलांवर उपचार करण्यात आले असून, बहुतांश विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी दिली.

केकत जळगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवी वर्गातील विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी पोषण आहारात आच्छादन निघालेली खुली बिस्किटे देण्यात आली होती. ही बिस्किटे खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, चक्कर आदी आरोग्यविषयक त्रास जाणवत असल्याचे समोर आले. याची माहिती पालकांपर्यंत पोहोचल्यानंतर काही जणांनी तत्काळ शाळेत मिळेल त्या वाहनाने धाव घेतली.

आणखी वाचा-पद्मश्री राहीबाईं पोपरे यांची बीज राखीच्या रूपाने आनोखी भेट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आपल्या पाल्यांना उपचारासाठी पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदिप काळे, प्राथमिक आरोग्य केंद्र नांदरचे डॉ. संदिप रगडे आदींसह खाजगी डॉ. जुबेर पटेल, विकास चावरे, डॉ. नरवडे यांनी उपचार सुरु केले. या घटनेची माहिती पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरदचंद्र रोडगे घटनास्थळी दाखल झाले.