वेदान्त-फॉक्सकॉन यांनी आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हलवल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यानंतर महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीतर उद्योगमंत्री उदय सांमत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वेदान्तचा एक प्रकल्प गेला म्हणजे, सगळचं गेलं असं होत नाही, त्याऐवजी दुसरी गुंतवणूक आम्ही राज्यात आणण्याचा प्रयत्न करतो आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – “…म्हणून बंडखोरांना थांबवण्यात अर्थ नव्हता”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण

Veterinary Officers, Veterinary Officers Suspended for Minor Reasons, Veterinary Officers Demand Immediate Reinstatement, Veterinary Officers demand to cm,
“मुख्यमंत्री महोदय, दहशतीत काम करतोय, लक्ष द्या,” कुणी घातले साकडे, ते वाचा…
eknath shinde slams uddhav Thackeray
बाळासाहेबांनी उद्धव यांना मुख्यमंत्री केलेच नसते! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा
nashik, External Affairs Minister, S Jaishankar, External Affairs Minister S Jaishankar, Maharashtra s Role in Food Grain, Trade Routes, Foreign Policy Differences,
व्यापारी मार्ग उभारणीनंतर कृषिमाल पुरविण्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वपूर्ण, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
3 75 lakh applications received for 1800 jail constable posts in maharashtra
कारागृह रक्षकांच्या १८०० जागांसाठी पावणेचार लाख अर्ज
Maharashtra Public Service Commission, mpsc, mpsc Announces exam date, mpsc Announces exam timetable, mpsc exam 2024, Gazetted Civil Services Preliminary Examination, Fill 524 Vacant Posts,
राज्य लोकसेवा आयोगाची ६ जुलै रोजी परीक्षा, राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
raj thackeray allegation on maha vikas aghadi during campging for naryan rane
जमिनींमध्ये दलाली हेच मविआ सरकारचे उद्योग; कणकवलीतील सभेत राज ठाकरे यांचा आरोप
Embezzlement, Embezzlement of Rs 9 Crore, Embezzlement Provident Fund Exposed, 89 Companies Involved Fraud, Provident Fund Fraud, Provident Fund, Fraud in pune, 89 Companies Provident Fund Fraud,
पुणे : आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधीचा अपहार; बनावट कागदपत्रांद्वारे नऊ कोटी रुपयांची फसवणूक
bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर

नेमकं काय म्हणाले उदय सामंत?

“आज केंद्र सरकारतर्फे ४३ देशातील उद्योपतींची गोलमेज परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात गुंतवणूक व्हावी, नवे उद्योजक तयार व्हावे, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. राज्यातून वेदान्तचा एक प्रकल्प गेला म्हणजे, सगळचं गेलं असं होत नाही, त्याऐवजी राज्यात दुसरा मोठा प्रकल्प व्हावा, मोठी गुंतवणूक व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. वेदान्तचा प्रकल्प हा तेव्हाच्या सरकारच्या दुर्लक्षामुळे गेला होता”, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुनील राऊतांची शिंदे गटावर सडकून टीका; म्हणाले, “शिंदे गटाविरोधात…”

दरम्यान, यावेळी त्यांनी कोकणातल्या रिफानरीला होणाऱ्या विरोधावरही प्रतिक्रिया दिली. “रिफानरीच्या जागेपैकी २९०० एकर जागेचं संमतीपत्र एमआयडीसीला मिळालं आहे. यासाठी एकूण ६ हजार एकर जागेची आवश्यकता आहे. मात्र, ज्या गावात रिफानरीचा संबंध नाही, त्या गावातही आंदोलनं करण्यात येत आहेत. खरं तर यात त्या आंदोलनकांचा दोष नाही. त्याठिकाणी राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे. आमदार रिफायनरीचे समर्थन करतात तर खासदार विरोध करत आहेत. याबाबत एक निश्चित भूमिका असणे आवश्यक आहे. त्यामुळे वेदान्त गेला म्हणून ओरडण्यापेक्षा रिफायनरी हवी की नको, याचं उत्तर त्यांनी द्यावं”, असेही ते म्हणाले.