औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीमधील व्हेरॉक इलास्टोमर्स कंपनीमध्ये वेतनवाढीच्या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी कंपनीतील कामगारांनी गांधीगिरीच्या मार्गाने लढा पुकारला आहे. गेल्या १७ दिवसांपासून अन्नत्याग करून कामगार काळ्या फिती लावत काम करत आहेत. मात्र या आंदोलनाकडे कंपनीने दुर्लक्ष केले आहे. विशेष म्हणजे आंदोलन काळात ‘बेस्ट’ काम केले असे म्हणत कंपनीकडून काही कामगारांना सन्मानित करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हेरॉक इलास्टोमर्स प्लांटमध्ये व्हेरॉक आणि स्वामी यांचे शेअर्स होते. स्वामी यांनी कंपनीचे शेअर्स खरेदी केले असून कंपनी त्यांच्या मालकीची होणार आहे. मात्र त्या अगोदरच कामगारांचा करार संपलेला आहे. त्याला बराच काळ लोटला आहे. ‘आम्ही व्हेरॉक कंपनीचे कामगार आहोत. त्यामुळे त्यांच्या इतर प्लांटमधील कामगारांप्रमाणे आम्हाला वेतन वाढ मिळावी’, अशी कामगारांची मागणी आहे. त्यासाठी त्यांनी कामगार आयुक्त यांच्याकडेही तक्रार केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varroc workers on hunger strike in aurangabad
First published on: 14-06-2017 at 14:11 IST