नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्य़ातील सुमारे ११ हजार मतदारांनी ‘नोटा’ अधिकाराचा वापर केल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर ‘नन ऑफ द अबॉव्ह (नोटा)’ हे मत नोंदवून नकाराधिकाराचा वापर करण्याची सुविधा गेल्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. त्या निवडणुकीत या सुविधेचा फारसा वापर झाल्याचे दिसून आले नाही. पण गेल्या रविवारी झालेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीमध्ये जिल्ह्य़ातील ११ हजार ६९० मतदारांनी  या नकाराधिकाराचा वापर केला. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये गेल्या १५ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. त्यामध्ये जिल्ह्य़ातील एकूण ७ लाख ९६ हजार ९५९ मतदारांनी मतदान केले. त्यापैकी दापोली मतदारसंघात ३ हजार ३४६, गुहागरात १ हजार ६९२, चिपळूणमध्ये २ हजार ०१३, रत्नागिरीत २ हजार ७०४ आणि राजापूर मतदारसंघामध्ये १ हजार ९३५ मतदारांनी हा नकाराधिकार वापरला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onनोटाNota
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voters use nota at large scale
First published on: 22-10-2014 at 01:54 IST