रायगड जिल्ह्य़ातील उल्हास नदीच्या खोऱ्यात मुबलक पाणी उचलण्याऐवजी कोयनेचे पाणी चिपळूणहून मुंबईला नेणे हे व्यवहार्य नाही. त्यापेक्षा कमी खर्चाचे पर्याय उपलब्ध असताना कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याचा अट्टहास का केला जात आहे, असा सवाल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी उपस्थित केला आहे. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिपळूण नगरपालिकेतर्फे डॉ. चितळे यांचा गुरुवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना चितळे यांनी कोयनेचे पाणी मुंबईला नेण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावर टीका केली. ते पुढे म्हणाले की, कोयनेचे अवजल चिपळूण येथून दूरवर मुंबईला नेणे परवडणारे नाही. शिवाय या पाण्याची मुंबईकरांना कितपत गरज आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. खरोखरच आवश्यकता असेल तर त्यापेक्षाही कमी खर्चीक पर्याय उपलब्ध आहेत. असे असताना हा अट्टहास का केला जात आहे, असा प्रश्न निर्माण होतो.

कोयनेचे अवजल चिपळूण येथून दूरवर मुंबईला नेणे परवडणारे नाही. शिवाय या पाण्याची मुंबईकरांना कितपत गरज आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. या खर्चीक पर्यायापेक्षा इतर पर्यायांचा विचार व्हावा.
-डॉ. माधवराव चितळे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why koyna water plan to supply mumbai madhav chitle ask question
First published on: 20-11-2015 at 03:37 IST