बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी म्हणून ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे पाहिले जाते. २० एप्रिल २००७ मध्ये दोघांनी लग्न केले. एक दशकापेक्षाही अधिक काळांचा या दोघांचा सुखी संसार आहे. ऐश्वर्या एक परफेक्ट आई, बायको आणि सून आहे. ती माझ्या आयुष्यात आली ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे असे अभिषेक अनेक मुलाखतीत म्हणतो. अभी- अॅशचे चाहते त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. त्यांच्या आयुष्यात नेमकी घडतेय तरी काय हे जाणून घेण्यात ते उत्सुक असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऐश्वर्याने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला एक प्रश्न विचारला की, तू कधी अभिषेकचा फोन त्याच्या नकळत तपासला का? या प्रश्नाचे उत्तर देताना तिने, कधीच नाही असे उत्तर दिले. तिचे हे उत्तर अनेकांना पटेल असे नाही. पण ऐश्वर्याने कधीच अभिषेकचा यपोन तपासला नाही या उत्तरावर ती ठाम होती. अॅशचा अभीवर पूर्ण विश्वास आहे हेच यातून दिसून येते.

अभिषेक आणि ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे ‘कुछ ना कहो’ हा त्यांचा एकत्र काम केलेला पहिला सिनेमा. यानंतर त्यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’ सिनेमातही काम केले होते. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये घनिष्ठ मैत्री झाली. ‘गुरू’, ‘सरकार २’, ‘उमराव जान’, ‘धूम २’ सिनेमांत त्यांनी एकत्र काम केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya abhishek wedding anniversary aishwarya never check husband abhishek bachchan phone
First published on: 21-04-2018 at 14:13 IST