बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. अभिनेता संजय दत्त यांच्या जीवनावर आधारित ‘संजू’चित्रपटाच्या दमदार यशानंतर साजहिकच अनेक निर्मात्यांचा कल बायोपिककडे वाढत चालला आहे. ‘संजू’ नंतर बाळासाहेब ठाकरे, सायना नेहवाल, गुलछन कुमार यांच्याही आयुष्यावर आधारित बायोपिक येत्या काळात येणार आहे. आता ‘विश्वसुंदरी’ ऐश्वर्या राय बच्चन हिच्याही आयुष्यावर बायोपिक यावा अशी इच्छा तिच्या चाहत्यांनी बोलून दाखवली आहे.

प्लास्टिक सर्जरीवर अखेर ऐश्वर्यानं सोडलं मौन

विशेष म्हणजे ऐश्वर्यानंही बायोपिकसाठी हिरवा कंदील दिला आहे. मात्र या बायोपिकची निर्मिती करताना तिनं एक महत्त्वाची अटदेखील ठेवली आहे. चित्रपटात जे काही असेल ते खरं दाखवावं अशी अपेक्षा तिने केली आहे. ‘संजू चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो एकतर्फीपणे दाखवण्यात आला होता. या चित्रपटातून संजय दत्तची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप अनेकांनी केला होता. मात्र ऐश्वर्यानं आपल्या बायोपिकमध्ये असं घडू नये इतकी माफक अपेक्षा केली आहे.

..म्हणून मुख्य भूमिकांऐवजी ऐश्वर्याची छोट्या भूमिकांनाच पसंती

जो कोणी माझ्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती करेल किंवा चरित्र लिहिन त्यानं माझ्याबद्दल पूर्ण माहिती घ्यावी. मला नीट समजून घ्यावं, फक्त चांगली बाजू न दाखवता सत्य दाखवावं असं तिनं डीएनएला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.