पोलिओ युनिसेफ मोहिमेचे बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन हे राजदूत आहेत. पोलिओचे अखेर भारतातून निर्मूलन झाले असून, अमिताभ यांनी त्याबाबत आनंद व्यक्त केला आहे.
२००५ साली राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आल्यापासून ते पोलिओ निर्मूलन यशस्वी होईपर्यंत अमिताभ हे यूनिसेफशी जोडले गेलेले आहेत. “भारतातून पोलिओचे निर्मूलन झाले आहे. गेली आठ वर्ष यूनिसेफचा राजदूत राहिलो. खूप आनंद होत आहे….” या शब्दात अमिताभ यांनी ट्विट केले. भारत हा पोलिओमुक्त झाल्याचे यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले.