अभिनेत्री राधिका आपटे आणि तिच्याभोवती असणारं चाहत्यांचं वलय या गोष्टी पाहता अनेकदा तिच्या वाट्याला आलेल्या गोष्टी पाहून त्याचा हेवा वाटतो. पण, मुंबईत येत या भल्यामोठ्या शहरात आपलं असं वेगळं जग आणि या गर्दीत स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी सुरुवातीच्या काळात तिलाही संघर्ष करावा लागला होता.

नुकतच राधिकाने एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला. सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण या कलासृष्टीत काम करण्यासाठी मुंबईत आलो, तेव्हा फक्त एकाच व्यक्तीचा दुरध्वनीक्रमांक आपल्याकडे असल्याचं तिने सांगितलं. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता अतुल कुलकर्णी. अतुलला राधिका अगदी सुरुवातीपासून, म्हणजेच पुण्यात असल्यापासून ओळखत होती.

https://www.instagram.com/p/Bl8LGd1H65Z/

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे असणाऱ्या एका डायरीतून एक नाव आणि मुंबईत तिच्या ओळखीचा एक व्यक्तीच डोळ्यांमोर येई, तो म्हणजे अतुल. पण, दररोज त्याला फोन करुन तरी कसं सतावणार, या विचाराने ती तेही करत नसे. या शहरात आल्यानंतर आपल्याच कलाने गोष्टी का घडत नाहीयेत, असा प्रश्नही तिच्या मनात घर करुन गेला होता. राधिकाने या मुलाखतीत बऱ्याच प्रश्नांवरही आपली प्रतिक्रिया दिली. विविध चित्रपटांतून आव्हानात्मक भूमिकांना न्याय देणाऱ्या राधिकाने ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधूनही चाहत्यांची मनं जिंकली होती.