उत्तर प्रदेशात चकमकीदरम्यान आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पोलीस उपअधीक्षकाचाही समावेश आहे. कानपूर येथे पोलीस विकास दुबे नाकम गुंडाला अटक करण्यासाठी गेली असता ही चकमक उडाली. या दुदैवी प्रकरणावर अभिनेता कपिल शर्मा याने संताप व्यक्त केला आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या या गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्याची विनंती त्याने प्रशासनाला केली आहे. अवश्य पाहा - उर्वशी रौतेलाने गौतम गुलाटीसोबत केलं लग्न?; फोटो पोस्ट करुन म्हणतोय शुभेच्छा द्या "आज मी रेस्ट इन पीस बोलणार नाही. कारण जोपर्यंत आरोपी पकडले जात नाही तोपर्यंत शहिद झालेल्या त्या पोलिसांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. युपी पोलीस लवकरात लवकर त्या गुन्हेगारांना पकडतील." अशा आशयाचे ट्विट करुन कपिल शर्मा याने शहिद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिलचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. अवश्य पाहा - सुशांतने आत्महत्या केल्यापासून अभिनेत्री पडली आजारी; होऊ लागलाय लो बीपीचा त्रास I will not say Rest In Peace because I know they will not until we find the culprits n kill them more power to u @Uppolice jus find them n kill them that’s it — Kapil Sharma (@KapilSharmaK9) July 4, 2020 हे प्रकरण काय आहे? विकास दुबे नावाच्या एका गुंडावर ६० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांचं एक पथक विकास दुबेचा शोध घेत होते. पोलीस बिकरु गावात विकास दुबेच्या शोधात गेली असता गुंडांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. इमारतीवरुन पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यात पोलीस उपअधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबल यांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहीद झालेल्या पोलिसांसाठी शोक व्यक्त केला आहे. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.