सध्या देशावर येणाऱ्या विविध संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणा सज्ज झाली आहे. या संकटांचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये धैर्याची गरज आहे, सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. हाच सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक कविता लिहिली आहे. ‘ये राष्ट्र पुन: खडा होगा..’ असे या कवितेचे बोल असून सोशल मीडियावर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

“जे घरबसल्या तुम्ही पाहताय, ते मी पण पाहतोय. आधी करोना आला, मग अम्फान वादळ आलं, मग आता निसर्ग आहे, तिकडे सीमेवर चीन बसलाच आहे. देशाच्या मागे या सगळ्या गोष्टी एकदम अशा का येतायत हे कळत नाहीये. पण हे सगळं घडत असताना मनात एक विचार सतत येतोय की ये राष्ट्र पुन: खडा होगा,” असं तो या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतोय.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आणखी वाचा : राजकारणात प्रवेश करणार का?; सोनू सूद म्हणतो.. 

संकर्षणची ही प्रेरणादायी कविता नेटकऱ्यांना पसंत पडली असून अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.