सध्या छोट्या पडद्यावर अनेक दर्जेदार मालिकांची निर्मिती करण्यात येत आहे. यात अनेक मालिका या स्त्रीप्रधान असल्याचं पाहायला मिळतं. याच मालिकांच्या यादीत आता आणखी एका नव्या मालिकेची भर पडली आहे. ‘स्वाभिमान’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून एका हरहुन्नरी तरुणीची कथा उलगडली जाणार आहे.

एका लहानशा गावात वाढलेल्या पल्लवीने शिक्षिका होण्याचं स्वप्न पाहिलं आहे. परंतु, तिच्या या स्वप्नांच्या मार्गात अनेक अडथळे आहेत. मात्र, स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. या मालिकेत अभिनेत्री पूजा बिरारी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर, अभिनेता अक्षर कोठारी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
albatya galbatya 3d movie coming soon vaibhav mangle play Chinchi Chetkin Role
रंगभूमी गाजवल्यानंतर रुपेरी पडद्यावर 3D मध्ये पाहायला मिळणार ‘अलबत्या गलबत्या’ चित्रपट, ‘हा’ अभिनेता दिसणार चेटकिणीच्या भूमिकेत
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
three khans conspired to get actors like Fawad Khan banned in India
फवाद खानसारख्या कलाकारांवर बंदी घालण्यासाठी कट रचला, पाकिस्तानी अभिनेत्रीचे तिन्ही खानवर गंभीर आरोप

‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते,’ असं सतीश राजवाडे म्हणाले.

दरम्यान, या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अक्षर कोठारी बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत या मालिकेत आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित ही कलाकार मंडळी स्क्रीन शेअर करणार आहेत. येत्या २२ फेब्रुवारीपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.