‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबतच मायरा ही चमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. या मालिकेतून प्रार्थनाने मराठी टेलिव्हिजन माध्यमात पदार्पण केले आहे. या मालिकेविषयी बोलताना प्रार्थनाने तिचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.

‘श्रेयससारख्या मोठ्या कलाकारासोबत काम करण्याचे माझे स्वप्न होते. त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी आंतरिक इच्छा होती. पण मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमाच्या संवेदनशील गोष्टीवर ही मालिका आहे त्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली’ असे प्रार्थना म्हणाली.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana (@prarthana.behere)

पुढे ती म्हणाली, ‘मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर आल्या. परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचे ठरवले होते. आपले चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. म्हणून मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि ही मालिका स्वीकारली.’