बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. ११ ऑगस्ट रोजी संजय दत्तने या संदर्भात सोशल मीडियाद्वारे माहिती दिली. संजय दत्तने कॅन्सरवर उपचार सुरु केले होते. दरम्यान संजू बाबा पत्नी मान्यता दत्तसोबत अचानक मुंबई सोडून दुबईला गेला होता. आता संजय दत्त पुन्हा मुंबईत आला आहे. १५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता संजय दत्त पत्नी मान्यतासोबत दुबईला रवाना झाला होता. संजू बाबा त्याच्या मुलांना, शहरान आणि इकरा यांना मिस करत असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी तो दुबईला गेला होता. मान्यताने संजय दत्तचे मुलांसोबत वेळ घावतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार आता संजय दत्त पुन्हा मुंबईत आला आहे. आता तो पुन्हा कॅन्सरवर ट्रीटमेंट घेणार आहे. View this post on Instagram Today.I want to thank God for the gift of family. No complaints.No requests. just to be together, forever. Amen #blessedbeyondmeasure #love #grace #positivity #dutts #beautifullife #thankyougod A post shared by Maanayata Dutt (@maanayata) on Sep 17, 2020 at 11:20pm PDT ८ ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची करोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. संजय दत्तला कर्करोग झाल्याचे कळताच अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टने त्याची भेट घेतली. तसेच अनेक कलाकारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे संजय दत्त लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे.