हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. हाथरसमधील पीडित तरुणीला न्याय मिळायलाच पाहिजे, अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी योगी सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या या भूमिकेला अभिनेत्री स्वरा भास्कर हिने पाठिंबा दिला आहे. "होय, ती तरुणी न्यायासाठी पात्र आहे बदनामीसाठी नाही." अशा आशयाचं ट्विट करुन स्वराने देखील सरकारवर निशाणा साधला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. YES — Swara Bhasker (@ReallySwara) October 8, 2020 अवश्य पाहा - "सरकारी पुरस्कार परत करणार होतीस ना?"; रियाची सुटका होताच स्वराने कंगनाला डिवचलं 5. हम इंसानियत के नाते चिता से फूल चुनकर लाए मगर हमें कैसे माने कि यह शव हमारी बेटी का है भी या नहीं? इन प्रश्नों के उत्तर पाना इस परिवार का हक है और उप्र सरकार को ये जवाब देना पड़ेगा। 2/2 — Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 3, 2020 हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधला. उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली. पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला उशिरा या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून होतो आहे.