बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत. ऐश्वर्या ही अभिषेकपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. त्या दोघांमध्ये कधीच ही गोष्ट आली नाही. एवढचं काय तर ऐश्वर्याची सुंदरता ही कोणाला ही घायळ करणारी आहे. मग अभिषेकनेही तिच्याशी या मुळेच लग्न केले असणार अशा चर्चा त्यांच्या लग्ना दरम्यान रंगल्या होत्या. मात्र, अभिषेकने तिच्याशी सुंदरतेमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे केल्याचं त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

अभिषेकने त्याच्या आणि ऐश्वर्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळीच त्याने ऐश्वर्याशी लग्न का केलं ते सांगितलं आहे. “ती खूप सुंदर आहे. फक्त एवढचं नाही तर ती एक सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. तिचे मन साफ आहे आणि हेच तिचे सौंदर्य आहे. तर याच कारणामुळे मी ऐश्वर्याशी लग्न केले आणि तिला जीवनसाथी म्हणून निवडले”, असे अभिषेक म्हणाला.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

अभिषेक म्हणाला, “व्यक्तीचे सौंदर्य हे ठराविक काळापर्यंत असते. परंतु एक स्वच्छ आणि सुंदर मन हे नेहमी त्या व्यक्तीसोबत असते. याच कारणामुळे बाह्य सुंदरतेवर प्रेम करू नका, तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवर करा. तुमचा जोडीदार हा फक्त सुंदर असला पाहिजे अस तुम्ही म्हणत असाल तर पुढे जाऊन ही मोठी चुक ठरू शकते. कारण जोडीदारासोबत तुम्हाला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहेत. त्यामुळे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असणे गरजेचे आहे.”