सध्या चर्चेत असलेले आणि रंगभूमीवर प्रचंड गाजत असलेले रत्नाकर मतकरी यांचे ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक बाल रसिकांसाठी पुन्हा एकदा पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. रत्नाकर मतकरी यांनी ‘हॅन्स अ‍ॅण्डरसन’ या जगविख्यात परीकथा लेखकाच्या ‘दि टीडर बॉक्स’ या परीकथेवर आधारित ‘राजकन्या आणि जादूची आगपेटी’ हे नाटक लिहिले. नंतर त्यात बरेच फेरबदल करून त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली लिहिले. हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आणि आता या नाटकाने ७५व्या प्रयोगापर्यंतचा पल्ला गाठला आहे.

मे २०१८ मध्ये या नाटकाचे नव्या संचातील प्रयोग सुरू झाले; आणि गेल्या दोन महिन्यांत या नाटकाने बालप्रेक्षकांची मने जिंकली. रविवारी, ८ जुलै २०१८ रोजी या नाटकाचा ७५वा प्रयोग शिवाजी मंदिर येथे सकाळी ११.०० वाजता सादर होणार असून ‘अलबत्या गलबत्या’ या नाटय़संहितेची नवीन आवृत्ती या प्रयोगात प्रकाशित होत आहे. या वेळी रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ आणि ‘झी वाहिनी’चे नीलेश मयेकर उपस्थित राहणार आहेत. या नाटकाची नाटय़संहिता प्रथम ‘पॉप्युलर प्रकाशन’ने १९७३ साली प्रकाशित केली होती. आता नव्या मुखपृष्ठासह नवीन मांडणीतील ही आवृत्ती बालरसिकांना नक्कीच आकर्षित करणारी आहे.

Loksatta Documentary Discovery channel David Attenborough Director
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘पाहण्या’च्या पर्यायांत दिशादर्शक…
Loksatta lokrang North Block Culture
निमित्त:  नॉर्थ ब्लॉक संस्कृती
Indecent act of loving couple in moving car in Nagpur
धावत्या कारमध्ये प्रेमीयुगुलाचे अश्लील चाळे…इंस्टावर चित्रफित प्रसारित होताच…
Revised schedule, admissions ,
व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांचे सुधारित वेळापत्रक जाहीर
BA BSc Bed Law 5 year courses admissions open Mumbai
बीए/बीएस्सी बीएड, विधि पाच वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना सुरुवात
loksatta editorial on election results in france left wing alliance won most seat in french
अग्रलेख : फ्रेंच ट्विस्ट!
Admission Process for MCA Vocational Course, MCA Vocational Course, MCA Vocational Course Admission Begins,
एमसीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात
Vidushi Singh UPSC exam air 13
पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या विदुषी सिंगने कशी केली होती परीक्षेची तयारी? घ्या समजून….

नुकताच रत्नाकर मतकरी यांना त्यांच्या एकूण बालरंगभूमीवरील योगदानाबद्दल साहित्य अकादमीचा बालसाहित्याचा पुरस्कार घोषित करण्यात आला. बालरंगभूमीवरील त्यांनी केलेल्या आजवरच्या कार्याचा खऱ्या अर्थाने गौरव झाला आहे. मराठी बालरंगभूमी केवळ टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर आपल्या अनेक उत्तमोत्तम नाटकांच्या साहाय्याने तिला सोनेरी दिवस प्राप्त करून देण्याचे सारे श्रेय मतकरींनाच जाते. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक १९७२ साली प्रथम रंगभूमीवर आले, मात्र पंचेचाळीस वर्षांनंतरही त्यातील ताजेपणा कायम आहे. हीच मतकरींच्या लेखणीची खरी किमया आहे.